Description
'नाही रे' वर्गातून 'आहे रे' वर्गात आल्यानंतर बहुतेकांना शैथिल्य येते. गत दिनाच्या विस्मृतीचा आजार जडतो. हा कवितासंग्रह मात्र त्या आजारास अपवाद असणाऱ्याचा आहे. त्यातही 'आहे रे' वर्गात आल्यानंतर ही, प्रसंगी रात्रंदिवस खाकी वर्दी अंगावर असतानाही, कविमन मात्र त्या ओझ्याखाली दबलेले नाही. संवेदनाशील मन त्या धकाधकीच्या आयुष्यातही करपले नाही, त्याची साक्ष हा कवितासंग्रह आहे.
कवितेचे पारंपरिक व्याकरण बाजूला ठेवून या कविता वाचल्या तर, यातील प्रत्येक कवितेतून जाणवते ती या कवीची मातीशी अतूट असलेली नाळ, समाजाचे आपणही काही देणे लागतो याची लख्ख जाणीव, गावांचे हरवत चाललेले गावपण, सैरभैर झालेला, भरकटलेला गावोगावचा युवक, भ्रामक अस्मितांच्या, प्रतिष्ठेच्या कल्पनांमागे अंधपणाने चाललेला आजचा समाज, हाती अमाप पैसा येऊनही हरवत चाललेले समाधानी जीवन, वर्दीत असणाऱ्याच्या बायकोची आणि अपत्यांची हुरहुर. या सर्व भावभावनांच्या कोलाजमध्येही ठळकपणे उठून दिसणारा रंग आहे तो कर्तव्यनिष्ठ असणारा खाकी रंग. त्याचेही दर्शन अनेक कवितेतून होते.
आपल्या जाणिवा, संवेदना कोमेजून जाऊ नयेत, असे वाटणाऱ्या प्रत्येकाने या कवितामधून येणारा गावच्या मातीचा, मायेचा सुगंध काळीज कुपीत जपून ठेवला पाहिजे
- दिलीप नाईक निंबाळकर
Additional Information
Publications : नीम ट्री पब्लिशिंग हाऊस (Neemtree Publishing House)
Author : संतोष भुमकर ( Santosh Bhumkar )
Binding : Paperback
ISBN No : 9788195777860
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 63 gms
Width : 14
Height : 0.5
Length : 22
Edition : 01
Pages : 72